उशिरा गहू पेरणी झाली म्हणून उत्पादन कमी येईलच असं नाही… पण त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी अगदी बारीकसारीक पातळीवर पाळाव्या लागतात. अनेक शेतकऱ्यांना याच ठिकाणी मोठी चूक होते आणि शेवटच्या टप्प्यावर दाणे हलके पडतात. या पोस्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे उशिरा गहू पेरणीसाठी आवश्यक सुधारित तंत्रज्ञान. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती.
साधारणपणे गव्हाची पेरणी ३० नोव्हेंबरपूर्वी करून घेतली जाते. पण यंदा पावसाचा कालावधी वाढल्याने अनेक शेतकऱ्यांची पेरणी वेळेत होऊ शकली नाही. ज्यांची पेरणी अजून बाकी आहे, त्यांनी १५ डिसेंबरपर्यंत उशीरा पेरणी करावी, अशी शिफारस करण्यात येते. मात्र हे लक्षात ठेवावे की पेरणी उशिरा झाल्याने उत्पादनात घट अपरिहार्य असते.
गजानन जाधव यांच्या मते, ३० नोव्हेंबरनंतर पेरणी जितकी पुढे ढकलली जाईल, तितका तोटा वाढतो—प्रत्येक पंधरवड्याला प्रति एकर साधारण अडीच क्विंटल उत्पादन कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे १५ डिसेंबरनंतर गव्हाऐवजी दुसरे पर्यायी पीक निवडणे अधिक फायदेशीर ठरू शकते.
येथे वाचा – तुरीवर शेवटची फवारणी आणि मिळवा टपोरे दाणे, आळी 100% खल्लास..
उशिरा पेरणीसाठी आवश्यक सूचना
1) उशीरा पेरणी करताना काही खास बाबी पाळल्यास परिणाम चांगले मिळू शकतात. 2) जमिनीत पुरेशी ओलावा असणे अत्यावश्यक. 3) पेरणीची दिशा उत्तर-दक्षिण ठेवावी, ज्यामुळे सूर्यप्रकाश जास्त मिळतो. 4) दोन ओळींमधील अंतर कमी करून सीड रेट वाढवावा. 5) पेरणीची खोली ५-६ सें.मी. ठेवावी. 6) पाण्याचे व्यवस्थापन काटेकोर असावे आणि दर १८–२१ दिवसांनी पाळी द्यावी.
गव्हाच्या महत्त्वाच्या संवेदनशील अवस्था
गव्हाला काही विशिष्ट अवस्थांमध्ये पाणी देणे अत्यंत गरजेचे असते— 1) मुकुटमळे फुटण्याची अवस्था : १८–२१ दिवस. 2) कांडी धरण्याची अवस्था : ४०–४५ दिवस. 3) फुलोरा व दाणे भरण्याची अवस्था : ६०–८५ दिवस. पाणी कमी उपलब्ध असल्यास ४० दिवसांनी एकच पाळी पुरेशी ठरू शकते. दोन पाळ्या शक्य असल्यास २० आणि ६० दिवसांनी द्याव्यात.
येथे वाचा – कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! कांद्याचे भाव वाढणार; हा निर्णय होणार गेमचेंजर!
बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण
उत्पादन वाढवण्यासाठी प्रारंभापासून योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे. बीज प्रक्रियेसाठी प्रति किलो बियाण्याला ‘रिहांश’ (कीटकनाशक), ‘झोरमेट’ (बुरशीनाशक) आणि ‘लिओसन’ (वाढ रोधक) यांचा वापर करावा. यामुळे खोडअळी, बियाण्याचे रोग आणि लोळण्याची समस्या कमी होते.
पेरणीसोबत डीएपी / 10:26:26 आणि पोटॅश द्यावे.
युरिया एकाचवेळी न देता दोन टप्प्यांत द्यावा—अर्धी बॅग २०–२२ दिवसांनी आणि उरलेली अर्धी ४०–४५ दिवसांनी. या पद्धतीने उत्पादनात जवळपास २०% वाढ होते, असे गजानन जाधव सांगतात. तण नियंत्रणासाठी २०–२५ दिवसांत जमिनीत ओलावा असताना ‘अलग्रीप’ (८ ग्रॅम/एकर) उपयुक्त ठरते. तर पोंगेमर व खोडअळीवर ‘रेज’ हे कीटकनाशक प्रभावी परिणाम देते.